भारत हा एक शेतीप्रधान देश आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात निरनिराळ्या प्रकारची पिके घेतली जातात. पण, आजही या देशातील शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बदलत्या हवामानामुळे शेतकर्यांना सर्वाधिक त्रास होतो, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते अशा परिस्थितीत भारतअॅग्री शेतकर्यांसाठी वरदान ठरत आहे. कारण भारतअॅग्री शेतकऱ्यांसाठी हवामानावर आधारित गतिमान सल्ला घेऊन आली आहे.
ज्यामुळे शेतकऱ्यांना तीन दिवसाचा हवामान अंदाज मिळणार असून यामुळे शेतकरी स्मार्ट होणार आहेत.
शेतकऱ्यांचा त्रास दूर करण्यासाठी भारतअॅग्री अॅप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच भारतअॅग्री अॅपने ‘मोफत कृषी कॅलेंडर’ ही सेवा आणली आहे.
याच्या सहाय्याने शेतकऱ्यांना तीन दिवसांचा हवामान अंदाज मिळणार आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना त्यांच्या पिकानुसार हवामानावर आधारित सल्ला देखील देण्यात येईल. विशेष म्हणजे या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक रुपया देखील खर्च करावा लागणार नाही. ही सुविधा अगदी विनामूल्य आहे.
शेतकऱ्यांना भारतअॅग्रीच्या या ‘मोफत कृषी कॅलेंडर’ सेवेचा फायदा होत असून यामुळे शेतकर्यांचे नुकसान कमी होत आहे आणि त्यांना पिकाबाबत योग्य ती माहिती ही मिळत आहे.
‘मोफत कृषी कॅलेंडर’ या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम भारतअॅग्री अॅप डाऊनलोड करावे लागेल. भारतअॅग्री अॅप डाउनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचे शेत भारतअॅग्रीशी मोफत जोडण्याची संधी मिळेल.
शेतकर्यांनी आपले शेत भारतअॅग्रीशी जोडताना त्यांच्या शेताविषयी थोडी माहिती द्यायची आहे. उदाहरणार्थ,
- आपल्याकडे किती एकर शेती आहे?
- आपण कोणते पीक घेत आहात?
- आपली शेती कोठे आहे?
- आपले पीक कधी पेरले गेले आहे? इत्यादी.
या माहितीच्या आधारे, भारतअॅग्री अॅप शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या जागेनुसार हवामानावर आधारित गतिमान सल्ला देते.
ज्याप्रमाणे एक खरा मित्र आपल्याला अडचणींपासून दूर ठेवतो त्याचप्रमाणे भारतअॅग्रीचे ‘मोफत कृषी कॅलेंडर’देखील शेतकरी मित्रांना वेळोवेळी हवामानावर आधारित अपडेट्स देऊन अडचणींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते.
बदलत्या हवामानामुळे शेतकर्यांचे पीक खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे पिकामध्ये रोग आणि किडींचा हल्ला होण्याचीही शक्यता असते. ज्यामुळे शेतकर्यांचे संपूर्ण पीकही उध्वस्त होऊन मोठे नुकसान होऊ शकते. परंतु आता भारतअॅग्री अॅप शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या जागेनुसार हवामानावर आधारित गतिमान सल्ला देणार असल्याने नुकसान होईल कमी आणि उत्पन्न होईल दुप्पट.
‘मोफत कृषी कॅलेंडर’ शेतकऱ्यांना त्यांच्या शेताशी संबंधित माहिती देऊन त्यांना सतर्क ठेवते. त्याच वेळी पिकामध्ये कोणत्या रोग व कीटकांचा हल्ला होऊ शकतो याविषयी देखील माहिती देते.
त्यामुळेच भारतअॅग्री अॅपच्या ‘मोफत कृषी कॅलेंडर’च्या सहाय्याने शेतकरी कमी किंमतीत अधिक नफा मिळवू शकतात. भारतअॅग्री अॅपच्या या ‘मोफत कृषी कॅलेंडर’ची सेवा मिळवून लाखो शेतकऱ्यांनी प्रगतीच्या मार्गावर पाऊल ठेवले आहे. आता तुम्हीही या ‘मोफत कृषी कॅलेंडर’ सेवेचा लाभ घ्या आणि स्मार्ट शेतकरी व्हा.
भारतअॅग्री अॅप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि निश्चिंत व्हा!
Help
Krishi calendar
शेती विषयक माहिती साठी चांगला app आहे. त्यामुळे शेतीचा विकास होऊन शेतकरी कर्ज मुक्त होऊन आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करेल व भरघोस उत्पन्न घेईल. धन्यवाद…!!!
Hi shri give me information about turmeric cultivation
Kh